गेली कित्येक वर्षे तु मला कवेत घेतलेस आज मात्र रागावलीस। सह्याद्रीच्या लाडक्या लेकी कृष्णा,कोयना,पंचगंगा रुसून बसल्यानां माहेरी।। निसर्गा एक मात्र बरे केलेस तुझ्या विसर्गाने , पिढ्यानपिढ्याचे वैर मात्र मिटत गेले। गुरे-ढोरांना वाचवणारी माणुसकी मी पुरात पहिली होती। नव्हता कुठला धर्म जात, माणुसकी मात्र एकवटली होती।। या सगळ्या प्रपंच्यात मदतीची यातना होती। राजकारण्यांची मात्र प्रसिद्धीसाठी चढाओढ चालली होती।। आला कारे तुझा देव सगळे मात्र विचारत होते, वर्दीतला मात्र देव देवाचे देव मात्र जपत होते।। मोडला जरी संसार आमचा तरी उठुन मात्र उभा राहणार,आई आंबेजोगाईच्या आशीर्वादाने बळीराजा शिवाराच सोनं मात्र करत राहणार।। दिल्लीचे ही तख्त राखतो असा आहे महाराष्ट्र्र माझा। मराठी स्वाभिमान जपला मात्र तुझी साक्ष असताना।। science काय ते मर्दा ते सुद्धा निसर्गा पुढे फिके पडले। कलयुगातील जल प्रलयाची आठवण ,संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने मात्र करून दिले।। पुराच्या हया विळख्यात , शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा उभे राहणार। 'जोतिबाच्या नावाने चांगभलच्या' नावाने सहयाद्री मात्र दुमदुमत राहणार।। ओंकार कापसे(करामत संग्रह) माझी जन्मभुमी