Nojoto: Largest Storytelling Platform

कधी तरी कोणावर जीवापाड प्रेम केल होत. पण शेवटी ते

कधी तरी कोणावर जीवापाड प्रेम केल होत. पण शेवटी ते कमी च पडले,प्रेमात नेहमी आनंद मिळेल असं नाही ना, दुःख ही सोसावं लागत.समोर चा जरी अहंकारी असला तरी आपल्याला च झुकावं लागत.पण असे नाते जास्त काल टिकले नाही. विचार केला जात आहे तो तर जाऊ द्यावं त्याला का बर थांबून ठेवावं, त्याला होती घाई दुसरी च्या मिठीत जायची, मग थांबून काय फायदा, केला रस्ता मोकळा त्याचा, नाही कोणतीही अडवणूक,पण एक प्रश्न तेव्हा पडला होता मला, मी इतकं प्रेम करून ही तो माझा नाही झाला, तर जिच्या साठी तो मला सोडून जात आहे. तिचा तरी तो असेल का,चांदण्याची ती लखळखती रात्र प्रेमाचा तो ध्यास लावून गेली, दाखवलेली त्याने गोड आयुष्याची स्वप्न क्षणात च त्याने मातीत मिळवले, असं हे पहिले प्रेम शेवटी काय अपूर्ण च राहील,

©Monika
  #पहिलं प्रेम अपूर्ण
monika2318417777175

Monika

Bronze Star
New Creator

#पहिलं प्रेम अपूर्ण #मराठीविचार

385 Views