तु पण करशील लग्न मुलाशीच पण त्यामध्ये माझं नाव नाही याची खंत आहे . . तुझ्या माझ्या असण्याचा काल्पनिक भास आहे म्हणून कदाचित माझी आनंदयात्रा संथ आहे . . तु मला , आपल्या नात्याला दिलेस पाहिले प्राधान्य तर सारं काही खऱ्या आयुष्यात शक्य आहे . . एक पाऊल पुढे टाकून केला जर प्रयत्न प्रामाणिकपणे तर तुला खरं सांगतो आयुष्यभर प्रेमळ सौख्य आहे. . निर्णय घेणे आहे बघ तुझ्या हातात पूर्णपणे वेळ निघून गेल्यावर एकदा , राहील मनस्ताप मनात . . सारं काही अलबेल करण्याची धमक ठेवतो मी फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी नव्हे ताकद आहे या प्रणात . . ©Mohit Jain जे दोघं 5 / 6 वर्ष सोबत राहून किंवा एकमेकांना जीव लावून दूर झाले आहेत. .अश्या प्रसंग घडलेल्या प्रत्येक व्यक्ती साठी काही लिहिलंय ज्याला ते Relate होईल का . .बघा वाचा . . #Luminance