गैरसमज होता माझा मैत्री आणि नाती तेव्हाच टिकतात जेव्हा विचार जुळतात, खरं तर नाती तीच टिकतात जे नात्याना जपून हाताळतात, ऐकून आहे मी माणूस जात फार स्वार्थी आहे पण जितक निस्वार्थी रहाव तो माणूस कधी एकटा पडत नाही, अहो कोणास ठाऊक हा माणूस जन्म पुन्हा एकदा वाट्याला येइल की नाही? एक क्षण असाही येइल जो नको होता नजरे समोर त्यालाही अखेर पहायला डोळे पाणावतील, कोणास ठाऊक त्याला न भेटण्याची खंत त्या माणसपर्यंत पोहचेल का नाही, आयुष्य माझ अर्ध संपत आलं हजारो लोकांना आजमावून मला एकच समजल जो नात्यांना संभाळून ठेवतो तो जगातून संपला तरी लोकांच्या जबानीतून अखंडपणे जिवंत राहतो, नात्यांबद्दल मला खूप काही लिहावस वाटत पण शब्द संपणार नाही, शब्दांना जरी अंत नसला तरी माझा अंत कधी न कधी असणार आहे, मी हायात जरी नसेल माझी कविता कधी संपणार नाही, कारण मी जोडलेली प्रत्येक नाती माझी अपूर्ण माझ्या कवितेला अंत नाही खात्री देतील, कारण,मला अंत असला तरी माझं शब्दांशी असलेल नात कधी संपणार नाही... लेखिका-संध्या कुचेकर(सांज) ©Sandhya Kuchekar-sanjh #WinterEve #Marathi #poem #life