माझ्या नशिबात इतकंच का ? मी तर किती दानधर्म करतो. हा प्रश्न बहुतेकांच्या मनी असतो, पण आपले कुठे नि काय चुकते. त्या कर्मावर भगवंताची बरोबर नजर असते. जे चुकीचे आपल्याकडून घडत असते, ते आपल्याला कधीच समजून येत नसते, पण भगवंताच्या नजरेतून कधीच सुटत नसते. तात्पर्य इतकेच की ज्याच्यात्याच्या कर्मानुसार मिळते फळ इतकेच जाणून घ्यावे, कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण फक्त कर्म करत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ हे ही आपल्याला इथेच भोगावे लागतात. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai