खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.