Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपल्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपल्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआपल्याशी यादव का गाना, आपल्या meaning in english, आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती, आपल्या जवळ जे आहे,

  • 70 Followers
  • 241 Stories

Dipesh Gulekar

read more
आपण आपल्या आयुष्यात बदल करून जर आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर आपण त्या बदलामुळे आपल्याला होत असणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून त्या बदलामुळे झालेलं दुःख आपल्या चेहऱ्यावर न दाखवता समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणेच योग्य....

                  -Dipya

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

bandu mamade

aapna time aaeiga Achal Sharma deba shah सूर्यकांत राठौर Rogi Kumari Anish Chhichholia

read more
❣❣❣❣❣❣❣❣
*वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला*💰
               *पण* ☝
 *आपल्या गरजेसाठी आपली माणसं*🤝👏
          *बदलू नका❣ aapna time aaeiga Achal Sharma deba shah सूर्यकांत राठौर Rogi Kumari Anish Chhichholia

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                                                           मित्रांनो, आपण इंद्रियाद्वारे जे जे शुध्द या अशुध्द स्वरूपात                                                                                                          ग्रहण करतो, ते आपल्या अंतरमनात आत्मसात होते. त्यात                                                                                                          जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणून आणि जे मिथ्य आहे ते मिथ्य                                                                                                         म्हणूनच जाणवत. जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ/ शुध्द नसते ,                                                                                                          तेव्हा जे अशाश्वत / मिथ्या आहे तेच शाश्वत वाटते  आणि                                                                                                           दृष्टी स्वच्छ झाली तर प्रत्येक गोष्टीचे खरे मुल्य उमगू लागते.                                                                                                         तेव्हा जगण्यातल जे जे अशाश्वतहोत ते ते ओसरू लागत                                                                                                                                        ‌आणि निसर्गरूपी शाश्वताकडे आपल्या मनाची ओढ वाढून                                                                                                         आपल्यात परमपूर्ण, अतुलनीय शांती उपजते. अॅड. सूर्यवंशी

Vrishali G

....

read more
थेंब थेंब पाण्याचे करतात आठवणी जाग्या ..
आपल्या सहवासाच्या 
     आपल्या मैत्रीच्या 
               आपल्या प्रीतीच्या ❤ 
                          आपल्या एकांताच्या 
                        आणि आता 
                                 आपल्या  
                                         विरहाच्या .. ....

Keshav Suryavanshi

read more
माझे मत--माझे विचार                                                      मित्रहो,जसे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या सोईने                                                      जगू शकतो.त्याच इच्छाशक्तीच्या                                                     जोरावर आपण आपल्या सोईने                                                     मरू शकतो.अॅड.के.एम.सूर्यवंशी

Pallavi Phadnis

read more
तू येतोस कधी दीड,पाच,सात 
दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती
सगळ्यांचा आपलासा होवून जातोस
झोपडे असो किंवा महालाचे दार
तु येतोस मुषकावर बसून स्वार
तुला बसायला सजते मखर पण
तुला माहितेयका ह्यासाठी किती
मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे  घर
तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण,
 आणि साजरा करताततुझा सण, 
काही जण तर भक्ती कमी आणि 
लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा 
फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव
सोन्याप्रमाणे तोलतात 
तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि 
थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने 
काहीजण असतात अधाशी
नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात 
गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात
तुला खरेच कारे हे सगळे लागते
तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते
मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला
असतोस ,म्हणूनच तर तू 
अतिभक्तीनेच बुडतोस,
कारण तू तर देव आहेस तू का
बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण 
करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील 
पुन्हा सगळे सोहळे होतील पण ,
एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला
अपघाती गेलेला असे भक्त त्या 
सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना 
आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा 
एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी,
मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही
आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती 
जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप
होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात
स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात

                 पल्लवी फडणीस,भोर✍

Keshav Suryavanshi

read more
माझे मत -- माझे विचार।                                                         मित्रहो, आपल्या  आचरणाचा  प्रभाव                                                           आपल्या  भाषणापेक्षा  अधिक असतो.                                   अॅड. के. एम. सूर्यवंशी

Keshav Suryavanshi

read more
माझे मत -- माझे विचार                                                    ‌मित्रांनो,                                                                                                                                     आपणास आपल्या आप्तेष्टांच्या आंतर- आत्म्यात  आपल्याबाबत आपुलकी - अथवा आपलेपण अपेक्षित/ अभिप्रेत - असेल/ तर प्रथम/ आपण आपल्या - आंतरमनात आपल्या आप्तेष्टाबाबत आदरभाव असणे आवश्यक आहे . अॅड .के. एम. सूर्यवंशी

Keshav Suryavanshi

read more
माझे मत -- माझे विचार                                                                            मित्रांनो,आपण नेहमी म्हणतो की,जगण आपल्या हातात आहे, मरणं नव्हे! हे सर्व स्वार्थी माणसाने, आपल्या संपत्तीचा तथा इतर वैभव सुखाचा आनंदाने उपभोग घेता यावा म्हणून! खरे पाहता,जन्म - मृत्यु आपल्या जीवनमुल्यातील एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.जसे नाणे स्विकारतांना आपण दोन्ही बाजूसह स्विकारतो .तसे जन्म- मृत्यु या शाश्वत सत्य असलेल्या जीवनमुल्याधिसष्ठीत नाण्यातील , जन्मरूपी बाजूचा केवळ मोहापोटी स्विकार करून, मृत्युरूपी दु: खमय बाजू आपण नाकारतो. जन्म - मरण हे अटळ असून,मिळालेले आयुष्य कसे जगावे हेआपल्या विचारधारेवर अवलंबून असते.अॅड.के.एम.सूर्यवंशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile