हरवलेल्या माझ्या नात्यांना या मीडियाने जवळ आणिले आणुनी फक्त दावणीला बांधले नात्यातले संवाद मुकेच राहिले पूर्वीची पत्रे साधीच होती शब्दांत मात्र ओलावा होता दूर कोसवर असलो तरीही नात्यात मात्र गोडवा होता कितीही वेळा वाचले तरीही पत्र पुन्हा पुन्हा वाचायचो कधी वाटले एकटेपण तर पत्रच घट्ट उराशी धरायचो हृदयाचे भाव शब्दांत मांडणारी आपुलकीची पत्रे हरवून गेली मृगजळासम आभासी दुनियेत जवळची नाती मात्र सुकून गेली #शिवराम