छळतात मला वेदना छळतात लोक सारी छळतात कोणी बोलून कोणी छळत अबोल्यानं. कोणी जखमेवर मलम लावत कोणी मीठ चोळतात आपुलकीचा आव आणून शब्द बाण मारतात. दुःख सांगण्याने हलकं होतं मनातली गोष्ट काढून घेतात जीव माझा जाळून शेकोटीला बसतात. कोण आपलं कोण परखं. सारखेच झालीत सारी एकला जीव एकांती हेच सूत्र भारी. ©कवी - अमोल आलझेंडे छळतात मला सारीच..