हरवलोय मी तुझ्या असण्याने आयुष्य आहे, तुझ्या नसण्याने सर्व काही व्यर्थ आहे तुझ्या होकारात माझे जीवन आहे, नकार तुझा मला म्रुत्यू समान आहे कधी स्वप्नात माझ्या, कधी सत्यात असते कधी आठवणीत माझ्या दाटून येते, कधी श्रावणधारा बनुनी बरसते, कधी गंध मातीचा बनुनी दरवळते, कधी फुलांपरी बहरुनी येते, कधी पाखरांपरी हुंदडत राहते, कस जगावं काही कळत नाही... मिटावे डोळे तर तुझ्याशिवाय काही दिसत नाही, विचार जरी आला मनात तर त्यात ही तू असतेस तुझी ओढ लागलेय इतकी की जिथे तिथे तुच दिसतेस सांग आता तू कस आवरू मी स्वत:ला, कसं सावरू मी स्वत:ला हरवलोय मी कुठे, शोधू कुठे स्वत:ला... Rohan....