कशी सुरुवात करावी,काय लिहावे नि कसे लिहावे, मनात तर नेहमीच येते,पण दरवेळी लिहायचे राहून जाते. "आई" साठी लिहायचे म्हटले,की हे असेच होत असे, पूर्ण दिवस विचार करूनही,तिच्यासाठी शब्दच सुचत नसे. "आई" साठी लिहायला घेताच,विचारांची घालमेल होते. कुठला शब्द पहिले वापरला जाईल,ह्यावरून शब्दशब्दात जुंपते. दिवस भर हातात असूनही,कागदावर न उतरल्यामुळे लेखणी ही रुसते. "आई" साठी लिहावे असे अनेकदा मनात येते, पण शब्दच सुचेना म्हणून दरवेळी लिहायचे राहून जाते. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.