बरसावं प्रश्नांनी एक-एक करून… शिस्थबद्ध विद्यार्थ्यांसारखं एका line मध्ये यावं… घाई नसावी, गडबड नसावी… शांत, संथ जरी असले तरी पार 'आर-पार' जाऊन ढवळणारे असावे.... नाहीच जर त्यांची उत्तरे मिळाली तर मग पेटावं त्यांनी उत्तरांसाठी… करावी आंदोलने, करावी जाळपोळ, करावे दंगे, गचांडी धरावी आणि नाकी नऊ आणावे उत्तरदायी इसमाला… #त्याने जरी कलम १४४ लागू केला तर मग आता घोळका करावा... गर्दीने यावं… बरसावं आता मुसळधार ढगफुटी प्रमाणे… नामोहरम करून सोडावं… एखाद्या वेड्या पिश्या प्रियकाराप्रमाणे पाठलाग करावा… अन उध्वस्त करावं #त्याला-स्वतःला... पण हे करताना प्रश्नांनी स्वतःलाच प्रश्न विचारावा का..?? कश्यासाठी..? कारण काय..?? अस्तित्व कश्याच..?? आणि बरेच…. कारण प्रश्नांना उत्तरे असतात आणि जर उत्तरेच नसतील ते प्रश्न नसतात...