Nojoto: Largest Storytelling Platform

New बहिर्जी नाईक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहिर्जी नाईक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहिर्जी नाईक.

Stories related to बहिर्जी नाईक

    LatestPopularVideo

Ganesh Rajeshirke

#letter कलाकार कोणास म्हणावे ? बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे

read more
कलाकार कोणास म्हणावे
ज्यांना टीव्ही वर पाहतो , 
नाटकात पाहतो , ते खरे कलाकार की , ज्यांच्या कलेने 
क्रांत घडली ते  खरे  कलाकार

©Ganesh Rajeshirke #letter कलाकार कोणास म्हणावे ?
बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे

viraj gosavi

वैभव नाईक वाढदिवस #मराठीविचार

read more

viraj gosavi

आमदार वैभव नाईक #मराठीविचार

read more

viraj gosavi

वैभव नाईक वाढदिवस #मराठीविचार

read more

viraj gosavi

निष्ठेचा पाईक वैभव नाईक #मराठीसंस्कृति

read more

Arun Chinchangi

आद्यक्रंतिवीर राजे उमाजी नाईक #story

read more
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक 
                        भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्यक्रांतीकारक , एक निर्भिड योद्धा...

 सह्याद्रीच्या कुशीत आणि पुरंदरच्या मुशीत डोंगर रांगांमधुन वसलेल्या 'भिवडी' या गावी समशेर बहाद्दर, शुर, पराक्रमी दादजी खोमणे यांच्या कुटुंबात ७सप्टेंबर १७९१ रोजी धगधगती ज्वाला घेऊन उमाजी जन्मास आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ज्या रामोशांनी आपला पराक्रम गाजवून छत्रपती शिवरायांचे मन जिंकले होते ते पणजोबा महालींगपती,आजोबा, वडील हे उमाजींचे वंशज होते. एका गरीब रामोशी कुटुंबात जन्मलेल्या उमाजी नाईक यांनी आपल्या मोजक्या सैन्याच्या पाठबळावर इंग्रजांसारख्या अफाट सैन्य व शस्त्रे असलेल्या शत्रूला गनिमी युद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इंग्रजांची झोप उडवून देवुन त्यांची दाणादाण उडवली होती. त्यामुळे त्यांना 'डोंगरचे राजे' म्हंटले जात असे. 
उमाजीला अन्याय व अत्याचाराची प्रचंड चीड होती. इंग्रजांनी भारतीयांच्यावर सुरू केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तरुण उमाजीने बंड उभे करून इंग्रजांना 'जशास तसे' उत्तर देत राहिले. इंग्रजांना अनेक भारतीय राजे, संस्थानिक, पाटील, कुलकर्णी, सावकार, जहागिरदार, वतनदार शरण गेले पण उमाजी या सर्वसामान्य तरुणाने मात्र इंग्रजांना 'पळता भुई थोडी ' करून सोडली. इंग्रजांना काय करावे सुचत नव्हते. उमाजींचे वाढते वर्चस्व इंग्रजांपुढे आव्हान होते. उमाजीने केवळ आपल्या समाजासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील पहिली इंग्रजांविरुद्ध क्रांती केली नसून सर्व भारतीयांच्यावरील अन्याय अत्याचाराविरुद्ध केली होती. 
" इंग्रजांनी लादलेला कर, वसूल भरू नका. भरतेवेळी आलेल्या इंग्रज व अधिकाऱ्यांना आम्ही ठार मारु " असे जाहीर आवाहन करून शेतकऱ्यांना संरक्षण देणारा उमाजीराजा आजही शेतकरी विसरणार नाहीत. जर त्यावेळच्या कुलकर्णी, जहागिरदार, सावकार, वतनदार, पाटील या मातब्बरांनी आपला वचक उमाजींप्रमाणे इंग्रजांना दाखवुन दिला असता तर इंग्रज आपला साम्राज्यविस्तार भारतात करूच शकले नसते. पण ते स्वतः इंग्रजांना शरण गेले आणि इंग्रजांना भारतात साम्राज्य विस्ताराची आयती संधी प्राप्त झाली. पण उमाजींसारख्या वाघाने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारूनही त्यांना कुलकर्णी, जहागिरदार, वतनदार, सावकार, पाटील यांनी पाठिंबा दिला नाही हे भारतीयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. इंग्रज व सर्व इंग्रजधार्जिण्यांना न जुमानता उमाजीने भारतीयांवरील अमानुष अत्याचाराविरूद्ध क्रांती सुरू केली आणि आपले वर्चस्व आपल्या कार्यातून सिद्ध केले हे ऐतिहासिक सत्य आहे!
उमाजींच्या बंडापुढे हतबल झालेल्या इंग्रजांनी उमाजींना पकडून देण्यासंदर्भात जाहीरनामे काढले. हे पाहून उमाजींनींही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला सरनामा जाहीर केला. इंग्रजांनी काही भारतीयांची लाचारी ओळखुन उमाजींना पकडुन देणाऱ्यास मोठे बक्षिस जाहीर केले आणि त्या अमिषाला बळी पडून काही फंद फितुरींनी उमाजींना इंग्रजांस पकडुन दिले. ते भारतीय म्हणवून घेण्यास पात्र नसावेत...! स्वकियांनीच उमाजींना वेळोवेळी संकटात टाकून त्यांना कायमचे संपवण्याचा प्रयत्न म्हणजे फार मोठा शाप आहे. हा शाप नसता तर कदाचित भारताला १९४७ पूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. 
३ फेब्रुवारी १८३४ च्या सकाळी ७ वाजता उमाजींना इंग्रज अधिकारी मॅकिंटॉश, जिब्रान, जेम्स यांनी फासावर चढवुन त्यांच्या पायाखालची फळी बाजूला काढली. आश्चर्य असे की, मुळचे मल्ल व खंडोबाचा परमभक्त असलेल्या उमाजीने सर्वशक्ती एकवटली तेंव्हा फाससुद्धा ढिला झाला. त्यांच्या तोंडातून " हिंदुस्थान झिंदाबाद " असा मोठा आवाज तुरुंग परिसरात पसरला. हे ऐकुन तेथे जमलेल्या लोकांनी उमाजीचा शेवट झाल्याचे समजले. इंग्रज अधिकऱ्यांनी त्यांचे प्रेत फासावरून काढून पुण्यातील शुक्रवार पेठेतील ततहसील कार्यालयासमोरील पिंपळाच्या झाडावर एका फांदीला दोराने बांधून लोंबकळत ठेवले. त्यांच्या मृत्यूनंतरही इंग्रज अधिकाऱ्यांचा राग शांत झाला नाही. आपल्याविरुद्ध जाणाऱ्यांची अवस्था कशी होते हे दाखवून देवुन दहशत माजवण्याचा इंग्रजांचा हा प्रयत्न होता. 
उमाजींचे प्रेत ज्या झाडाला लोंबकळत ठेवले होते ते पिंपळाचे झाड आजही पुण्यातील शुक्रवार पेठेतील तहसील कार्यालयासमोर त्या घटनेची, उमाजींच्या निस्सीम त्याग व बलिदानाची साक्ष देत उभा आहे.                                                              

• संकलन : 
      - अरुण चिंचणगी. ( C Arun )
       माणगांव. ता.चंदगड, कोल्हापूर. आद्यक्रंतिवीर राजे उमाजी नाईक

Kunal rathod

क्रांतीवीर वसंतरॉव नाईक साहेब #पौराणिककथा

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कवी अविनाश चव्हाण रचित फलटणचे अधिपती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत #nojotovideo #मराठीसंस्कृति

read more

RJ कैलास नाईक

मी कधी मांडत बसत नाही उरलेल्या श्वासांचे गणित,श्वास तू माझा कैलास नाईक Video #Nojotovoice #nojotovideo

read more

RJ कैलास नाईक

मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक

read more
 मित्रांच्या मैफिली रंगायच्या
गावातल्या वडाच्या पारावर
संवादच संपला एकमेकातला
आता कुलूप असते घरावर
           कैलास नाईक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile