Find the Latest Status about दिनाचा दयाळू मनाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिनाचा दयाळू मनाचा.
kokate abhi
साद घालते मन माझे तुझ्या मनाला चालु किती मी एकला या वाटेवरी तुझ्या आठवांचे काहूरं जळते उरी विसरलो दुनिया जरी दुनिया विसरली तरी तु या जिवाची स्वप्नसुंदरी या मदनाची मंजिरी माझी दुनिया फिरते तुझ्याचं भोवती दिस्-रात निघते न्हावुन अंतरीच्या आसवात ओढ तुझी गोड आणते ओढीत टाकते पुन्हा गुंतवून आठवांच्या बेडीत सांग तरी मी आस कुठवर झुरायचं माझ्या अंतरीचं लव तुला कस कळायचं सांग कधी ऐकू येणार तुला या मनाची साद हवा आहे तो फक्त तुझा एक रिप्लाय अजुनही वाट पाहतोय....... मनाचा साद
Sakshi Likhar
किनाऱ्यावर बसून समुद्राच्या खोलीचा अंदाज कधीच बांधता येत नसतो. मग एखाद्याचा मनाचा किनारा न ओलांडताच आपण एखाद्याबद्दल निर्णय देऊन मोकळे होतो हे कितपत योग्य असावं..? #मनाचा किनारा
gauri kulkarni
(काल्पनिक) कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ
🤗dnyaneshwari gulewad🤗
"बहरलेला वारा उदासलेल मन बरसनार्या धारा औसरनारे आसव हे फ्कत पे़मातच दिसत! ©dnyaneshwari gulewad #मनाचा मोहर#
कवी - के. गणेश
आवड अन् निवडीचा हट्ट कधी कधी महागात पडतो, कारण फक्त एकच असतं, गुंतलेला जीव नडतो..! @kganesh मनाचा हट्ट
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कधी -कधी काही गोष्टींची किंवा काही व्यक्तींची अशी सवय लागून जाते आपल्याला की, आपण त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. वस्तू नाही भेटली तर जीव तळमळतो. तसंच आपण ज्यांच्यासोबत रोज बोलतो ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटतेय. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होते, अश्या व्यक्तीसोबत एक दिवस जरी बोलणं नाही झालं की, काहीतरी अधुरं राहिल्यासारखं वाटते. समोरच्या व्यक्तीला माहित नाही पण आपलं जीव जडलं की, नाही राहवून होत त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय. आपण कधी बोलतो आणि किती बोलतो ह्याचाच सारखं विचार असते मनात. कारण, एकदा मन कुणात गुंतलं की, ते आपलं राहत नाही. सारखं त्याच व्यक्तीचं विचार, काळजी मनात असते.. मनाचा गुंता सोडवता येत नाही सहजासहजी.. खरं ना? ( प्रीत ) गुंता मनाचा