आंधळा बाजार... आंधळ्यांनी दळावे पीठ किती?... श्वानांनी व्हावे मस्तवाल किती?... नाव राखण्या दिव्यांचे ईथे, अबोल वातींनी जळावे किती?... दुत झाल्या देव-दुतांनी, भोळ्या भक्तांस लुटावे किती?... शोषून रक्त करंट्यानी, रक्त शापीतांचे घोटावे किती?... कुंपन खाई शेत सारे, कुंपनानेच पिकांस चाटावे किती?... घाम गाळी कष्टकरी हां, रणरणत्या उन्हात त्यानं आटावे किती?... कवीराज ©HANAMANT YADAV (कवीराज) #Call #nojotomarathi #Hanamant सचिन पट्टेबहादूर सतीश देशपाडे कवी - के. गणेश