Find the Latest Status about आयुष्य बदलेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य बदलेल.
Priyanka Jaiswal
White आयुष्य आयुष्याच्या वाटेवर दुःख खूप येतील, पूर्ण होतील काही स्वप्न काही अपुरीच राहतील.. कधी आपण हसू तर,कधी आपण रडू... आयुष्याच्या शर्यतीत, उंच उंच उडू .... मानव आहोत आपण ,आहे आपल्याकडे मन.. आयुष्यात येतील ,सुख दुःखाचे क्षण... सुखामध्ये हसणार आपण,दुखामध्ये रडणार.... मात घालुनी दुःखाला,वेळेबरोबर पळणार... आयुष्य आहे शर्यत ,त्यात सहभागी आपण होऊ... मृत्यू येईपर्यंत त्याच्याशी लढा आपण देऊ... कुणी असतो भाऊ तर,कुणी असतो पिता कुणी असते ताई तर,कुणी असते माता. . आयुष्यात असे हे नाते,जुळलेले असतात... त्याच्यासाठी डोळ्यात ,स्वप्न नवी सजतात... त्या स्वप्नांना पूर्ण करत,आयुष्य हे संपते... तरी म्हणतो देवा,थोडे आयुष्य जास्त दिले असते... शेवटपर्यंत आपण लढत असतो जीवनाशी, सामोरे जाता जाता त्याला,भेटतो मृत्यूशी... मृत्यू म्हणतो चल आता,वेळ तुझी आली... खूप जगला आयुष्य,आता माझी बारी... ©Priyanka Jaiswal #आयुष्य
nisha Kharatshinde
आयुष्य एक अमावस्या कुस्करले ते आयुष्य व्यर्थ ग्रहणमयी चंद्रासंगे हसूनी तारका तरीही दर्शवी खूश आम्ही स्वर्गामध्ये सहनशक्तीशील अर्धांगिनी ती पिलांसाठी उभी ढाल धरुन सरले आयुष्य लढता लढता चेहर्यावरती समाधान दर्शवून तरुणच राहिलेले ह्दय आशेने कुरवाळत शब्दांस होते 'आयुष्य एक अमावस्या' कथा लिहतानाच व्यक्त होत होते चारोळीतून निशब्द भावना जगत होत्या आयुष्य नवे लढली रणांगणात मैदानी घेऊनी पिल्लांना कवे ✍️ निशा खरात/शिंदे ©nisha Kharatshinde आयुष्य एक अमावस्या
nisha Kharatshinde
White किती आहे आयुष्य पुढे? किती आहे आयुष्य पुढे ना कुणास अजून कळलेले मग रुसवे फुगवे कशासाठी स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले कुणी कुणास ना जन्मी पुरले नाती-गोती रमण्यासाठी काही रक्ताची,काही प्रेमाची आहे तोवर जगण्यासाठी कुणी कमी तर कुणी वाईट ज्याचे त्याचे मतभेद सारे करोडो चेहरे विभिन्न असताना का जगावे कुणी मनासारे असा घ्यावा अनुभव जगण्याचा क्षणालाही थांबावे वाटेल सुर्यास्त अन् सुर्योदयामधील प्रत्येक क्षण जगावा वाटेल इथेच जन्म अन् इथेच मरण देह ही क्षणीक नश्वर आहे साठा संचयही वाहून जाता सोबत पुरवेल ती माणूसकी आहे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?
Sangeeta Kalbhor
उन्हाच्या झळा.. उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचार करुनिया नको रे घालू आयुष्यावर घाला चालून बघ दोन पावले गती येईल चालण्याला अनाहत नाद तुझ्याच अंतरी तुला येईल रे भेटण्याला ध्यानमग्न होता होता शंखनाद ही येईल ऐकू ओमकार जो करील जाप कोणापुढे ना देणार झुकू शाश्वत आहे अमर आत्मा आरोग्य हा तयाचा मार्ग खरा कशास धुंडाळितो इतस्ततः अंतरात तुझाच शोध घे ना जरा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचा
Dk Patil
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा