Find the Latest Status about नाही राहिली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाही राहिली.
✍️Sushil Kedare
माणसं आता आधीसारखी नाही राहिली......... जवळून गेल्यावर लोक आता ओळख देणार नाहीत, पण,सकाळी GM चा संदेश पाठवतील, जर मेला कोणी तर त्याला ONLINE च श्रद्धांजली वाहतील, बोलायला ही आता नमस्कार नसतो, सुरवात HI ने करतील, स्वतःकधी संपर्क करणार नाही, पण,दुसऱ्यावर राग भरतील, जेवणकरण्या आधी WHATSAPP वर STETUS टाकतील, मुकेच झाले लोक सुशिलआता, दोन गोड शब्द बोलायची सवय लोप पावली, कारण,माणसं आता आधीसारखी नाही राहिली......... माणसं आता आधी सारखी नाही राहिली........
yogesh atmaram ambawale
कळी होती आधी, नाही पाहिले तेव्हा कुणी कधी. फुल होताच सर्वांना आकर्षून गेली, नाही राहिली आता ती साधी कळी. पाहताच हे सुंदर सुगंधित फुल, सर्वांच्याच मनात भरले. सुगंध ह्या फुलाचा इतका दरवळे, फुलास ह्या आपले करण्या हात सरसावले. आवडताच कित्येकांस हे फुल, ठेविले काहींनी बागेत शोभा वाढावी म्हणून. तर तोडले कित्येकांनी हे फुल, आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. सजविले कित्येकांनी ह्यांस देवा चरणी, तर कुस्करले कित्येकांनी ह्यांस स्वतःच्या पायांनी. फुलाला ही वाटले आता,उगाच मिळाली मला ही संधी. फुल होण्यापेक्षा बरी होती,जेव्हा मी कळी होती आधी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळी होती आधी... #कळीहोतीआधी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
आपुलकी नाही राहिली आता जनमनात, स्वार्थीपणा,मतलब इतकंच ह्यांच्या मनात. कित्येकांस मानले आपले,कित्येकांचे दुःख जाणिले, कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात एक घर बनविले. धावलो कित्येकांसाठी,कित्येकांना मदतीचा हात दिला, दिवस सरून जाताच,कित्येकांनी माझ्याशी किनारा केला. धडा घेतला,शिकलो,भावनाहीन बनून राहायचे ह्या जगात, पाषाण झाले आता मन, उरल्या न कोणत्याच भावना ह्या मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना... #उरल्याना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
Secret Quotes
बरेच वर्ष झालेत बराच काळ निघून गेला नाही कुठला सण नाही कुठला आनंद, जनू मी वेगळ्याच जगात जगतोय सोडून जाणारा प्रत्येक व्यक्ती खुश आहेत फक्त मी सोडता, त्या गोष्टीवर विचार एवढे करतो की आज पण झोप नाही येत जीवाला लागल्यात काही गोष्टी सहज लोक विसरून जातात यार, एका व्यक्तीला बघितल्या शिवाय माझा एक ही जात नव्हता नशिबाने खेळ असा मांडला की रोज बघणं माझं आठवड्यात झाले नंतर महिने आता वर्ष पण तरीही त्या व्यक्तीची आस आणि कंळकंळ हवास होता त्या व्यक्ती चा आभास असा की नुसती आठवण जरी आली तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नव्हते, पण नियतीला काही देखवल नाही ज्या गोष्टी मुळे काही का होईना मला जगूशी वाटत होते ते सुद्धा हिरावून नेलं, ती व्यक्ती दूर राहून पण जवळ असायची पण वेळ आज विरुद्ध फिरत आहेत ती जवळ असून ही तिला एकदा पण पाहूशी नाही वाटले, शेवटी तिथेच किंमत कळाली मला माझी गरज आणि काळजी फक्त मलाच होती मी नाराज काय होतो तर त्या व्यक्तीच एकदा सुद्धा मन नाही झालं का बघायला सोडा दोन शब्द बोलायला सुद्धा वेळ नव्हता का, असे खूप विचार त्या क्षणी मनात जखमां चिकदळायचे काम करत होते, आहे का मेला जाणून पण नाही घेऊ शकत एवढी स्वार्थी कसे झाले.. -AS Patil✍️ दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प
yogesh atmaram ambawale
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे, फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे, वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची, आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो, त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली. केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला. ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला. जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय
Rani battewad
arti kishor biyani
प्यारे दोस्त ............... ©arti kishor biyani विचार गेले सोडून राहिली फक्त मुर्ती
vaishali
🌷 दूर राहिली प्रीत ही 🌷 दूर राहिली प्रीत ही होती रुजली या मनी सोडिलीस साथ माझी राहिल्यात आठवणी आठवणी मनात या घेऊनिया मी जगते आरशात पाहताच रूप तुझेच दिसते सांग मी विसरू कशी तुझी अन् माझी प्रीत ओठांवर राहिलेत फक्त प्रीतीचेच गीत खेळ खेळलास खोटा हृदय माझे तोडुनिया डाव हा अर्ध्यावरती गेला का तू सोडुनिया वाट बघते सजनी तुझ्या प्रेमात बावरी तुझी नी माझी राहिली प्रेम कहाणी अधुरी दूर राहिली प्रीत ही # (अष्टाक्षरी काव्य )