Find the Latest Status about आपली माणसं स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपली माणसं स्टेटस.
shambhugiri kamble
Quotes on family आपली माणसं.... दिवसामागुन दिवस निघुन जातात जिवनाचे चित्र बदलवुन जातात, काही होतात आठवणी धुसर काही नकळत पुसून जातात... विसरुन जातात नावे काही चेहरे मात्र लक्षात राहतात, वरवरची ओळख काहींची काही कायम मनात राहतात... बदलतात ऋतू बदलते वेळ ही माणसे मात्र काही बदलत नसतात , स्वप्नांचा झुला सोबत झुलतात सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं
Diksha Wardhe
चांगल्या लोकांबद्दल मनामध्ये भान ठेवा, स्वभावातल्या गोडव्याने सर्वांचा मान ठेवा, नात्या नात्यातील रागाला जरास दूर ठेवा, चुकीच्या शब्दांनाही मनापासून भूल ठेवा, सोबत असलेल्या मैत्रीत हक्काची हाक ठेवा, नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीचा मान ठेवा. आपली माती आपली माणसं...
Rutik jiddewar (R.J)
"निळी नाती आणि आपली माणसं" लहान पणीपासून अगदी आतापर्यंत नशिबानं जी माणसं मिळाली ती फार जिव्हाळी लागली पण ती कधीच आपल्यासाठी थांबलेली नाही. त्यांच्या नशिबाचा रस्ता सर करता करता आता ती खुप दूर गेलेली आह. पण लहान होतो तेव्हा याची जाणीवच कधी झाली नाही त्यांच्या सोबत दिवस घालवण्यात एवढा रमलो की ते कधीतरी आपल्याला सोडून कुठे तरी दूर निघून जाईल हेही कधी समजलं नाही कधी केव्हा ते कधी भेटतात पण आजकाल त्यांच्याकडे सुद्धा वेळ उरलेला नाही सतत जो तो आपापल्या अभ्यासात, कार्यात व्यस्त आहे. पण जे सुख मी त्यांच्या सोबत भोगलं ते कधी विसरलो नाही आणि ते विसरण्याची ईच्छा सुद्धा नाही ती आठवण मरेपर्यंत नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही. पण त्यातून हे समजलं की आज जी माणसं आपल्याबरोबर आहे त्यांच्यासोबत आयुष्य आनंदीत जगत राहायच. - ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J) निळी नाती आपली माणसं
yogesh atmaram ambawale
जीव तळमळतो ज्यांच्या भेटीसाठी ती आपली माणसं असतात. आठवण येते सतत,सतत ज्यांच्याशी बोलावेसे वाटते, ती आपली माणसं असतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
शब्दवेडा किशोर
माणसं.. आपल्या आयुष्यात येणारी माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या पाखरासारखीच असतात. एकदा का त्या पाखराने आपलं घरटं सोडलं की ते पाखरू त्या घरट्यात कधी येत नाही.. कारण त्या पाखराला आभाळाची ओढ असते. आपल्या आयुष्यात येणारी चांगली माणसंसुद्धा या घरटं सोडून गेलेल्या पाखरागतंच असतात. एकदा का ते माणसं आपल्या आयुष्यातुन निघून गेले पुन्हा परत आपल्या सहवासात येत नाहीत किंवा ते परतण्याच्या संधी खूपच नगण्य असतात. ©शब्दवेडा किशोर #माणसं