Find the Latest Status about आपल्याला म्हातारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्याला म्हातारी.
Shudhodhan Ahire
Chandu Karale
Supriya Yewale
कधी कधी काय होतं सांगू आपला जास्त चांगुलपणा ना आपल्याला खूप एकटे पाडतो खरंतर आपल्याला जास्त करून त्रास त्याच व्यक्तीचाा होतो ज्याच्यासाठी आपला जीव जळतो पण त्या व्यक्तीला हे नाही समजत पण जन्म समजतो तेव्हा खूप वेळ निघून गेलेलीतेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते खरंतर नातं जास्त करून याच कारणामुळेे तुटून जाते ©Supriya Yewale #Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो.
Supriya Yewale
Tejal Dilip Chavan
Picture With Deep Meaning..... ©Tejal DHC this picture has very deep message for all the girl's आज ची परिस्तिथी पाहता प्रेम हे प्रेम राहिलं नसून एका प्रकारे हिंसा झाली आहे आपल्या आयु
shiv Construction
जोपर्यंत आपले हितचिंतक आपल्या चांगल्यासाठी काही बदल करायचा सल्ला देतात तेव्हा तो ऐकावा. कारण...नंतर तो सल्ला आपल्या लक्षात आल्यावर आयुष्यातला बराच वेळ पश्चाताप करण्यात, आणि त्या नंतरचा वेळ बदल करण्यात निघून जातो......! 7620552382 ©Shiv Construction जगण्याचा मार्ग जर सुकर व्हायचा असेल तर, आपल्याला अनुभवातून सल्ले देणार्या लोकांचे नक्की ऐका, कारण ते अनुभवाचे बोल असतात.
Shubham Dhotre
गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत….. गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय … आपून उब्यानेच पेपर लिवू बगा… गुरूजींनी शाळा सोडली… ©Shubham Dhotre #andhere गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत….. गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय … आपून उब्यानेच पेपर ल
Vaibhav Thakre
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा