Find the Latest Status about न्यायाधीश होण्यासाठी काय करावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, न्यायाधीश होण्यासाठी काय करावे.
पंच_भाषी_लेखिका_तरुणा_शर्मा_तरु
शीर्षक कैसा गुनाह कोणत्या प्रकारचा गुन्हा विधा वास्तविक भाव शायरीनुमा Real pic converd Al मुलीचे चारित्र्य असणे हा काय गुन्हा आहे आणि भव #Life #Emotions #Trending #बेटी #poetrycommunity #indianwriter #मराठी #tarukikalam25
read moreRaj kumar kumar
The answer of Tathagat on non violence was :- “Whoever is punishable, must get that punishment. Whichever gift is worthy, must be given that gift only. Also, no one should be tortured, instead they should be treated with love and mercy. There should be no contradiction in words. Whoever suffers punishment for a crime, it is not due to the judge's punishment but is the result of his own action. The punishment given by the judge is the result of that crime. ©Raj kumar kumar The answer of Tathagat on non violence was :- “Whoever is punishable, must get that punishment. Whichever gift is worthy, must be given that
The answer of Tathagat on non violence was :- “Whoever is punishable, must get that punishment. Whichever gift is worthy, must be given that #Quotes
read moreSangeeta Kalbhor
अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार... सौभाग्याच्या सीमेशिवाय... पण तरीही ..हो तरीही...एखादा असा श्वास हवा वाटतो मला जो माझ्या अतृप्त असलेल्या मनाला तृप्त करेल आणि एक ..फक्त एक श्वास माझ्यात असा भरेल जो सगळ्या उणिवांना सातासमुद्रापार दूर फेकून देईल... मी घोळक्यात असो की असो मी एकांतात...माझ्या चेहऱ्यावर येणारी ती उदासवाणी रेघ दिसूचं नये माझ्या चेहऱ्यावर असे मला सातत्याने वाटते...आणि म्हणूनच हा आर्त भाव व्यक्त करण्याचा अट्टाहास बघं... तू ही म्हणशील काय हे खुळ घेऊन बसलीयेस डोक्यात...काहीचं वाटत नाही कसं तुला हे सगळं व्यक्त व्हायला... पण खरं सांगू... नाही वाटत मला रे... तुला माहिती आहे... अजून माझ्या अधरांवरची ती गुलाबी लाली तशी तशीच आहे... मला वाकोल्या दाखवत.. मला चिडवत... हो... नाही उतरला कधी अधर माझ्या अधरांवर कारण मला माझ्या अधरांना अशा अधरांत सोपवावेसे नाही वाटत ज्या अधरांना अधरात सामावताना मला ग्लानी वाटेल... मला ते अधर निर्व्यसनी हवेत ... मला ते अधर कमळाच्या फुलांगत हवेत... जे मातीतही उगवून देवीदेवतांच्या चरणी अर्पिले जातात... गोड गुपित आहे हे माझे... असो... मी अशीच आहे रे... नाही म्हणजे नाहीचं... राहिल्या काही भावना उपाशी तर काय बिघडते पण तत्वांशी नाही बरं वैर करायच.... ए ऐक ना.... तू तो माझा श्वास होशील का... अधरांशी हितगुज करणारा आभास होशील का... नाही...म्हणजे तुला तिथूनच आल्या पाऊली जावे लागणार हे निश्चित... आणि हो जाण्याच्या तयारीने यावेस ... आलास तर.... पण अधरांचे संगीत मात्र ऐकायचे आहे हं मला... अगदी निखालस...... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क
अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क #कविता
read moreSantosh Jangam
White "मतदान - लोकशाहीचा दीप" मतदान, लोकशाहीचा सन्मान, जागृत नागरिक, देशाची शान। बजावा, मतदानाचा अधिकार, करा संविधानाचा, सण साकार॥ असंख्य समस्यांस, एक उत्तर, बोटचं ठेवा, आपल्या हक्कावर। विकास पथ हा, करू या सुदृढ, विकसित देश, इच्छा मनी दृढ॥ भ्रष्टाचारास हा, जोरात फटका, मार्ग प्रगतीचा, शोधू या नेटका। आधुनिक शिक्षण नि तंत्रज्ञान, संस्कृतीचा ही, जपू या स्वाभिमान॥ बळीराजास देऊ, दिन सुखाचे, हेच खरे, शिल्पकार भारताचे। योजनांचा आधार, देऊ त्यांना, मुक्त करुनीया, विश्व बाजारांना॥ स्त्री-पुरुष समान, घ्यावा हा वसा, सहभाग घेतं, उमटावा ठसा। जात-धर्म विसरा, द्या मूठमाती, मतदान हक्कचं, आपुल्या हाती॥ आवाज आपला, बुलंद करावा, लोकशाहीचाचं, आग्रह धरावा। माझा देशचं, हा माझा अभिमान, मतदान करू, बनवू महान॥ प्रत्येक मतास, असते महत्व, हेचं ते परिपक्व, देशाचं सत्व। पूरी करू, आपण जबाबदारी, लोकशाहीत, जनता अधिकारी॥ निर्भय होऊन, करा मतदान, सुवर्णमय भविष्य, मागू दान। देशसेवेसाठी, हा एकच मंत्र, मतदान करा, मिळूनी सर्वत्र॥ देशसेवा ही, आपली खरी पूजा, भारतीयता सदा, जपते प्रजा। लोकशाहीचा हा, दीप उजळावा, मतदानानेच, देश घडवावा॥ ©Santosh Jangam #election लोकशाहीत मतदान हा नागरिकांचा महत्त्वपूर्ण हक्क आहे. प्रत्येकाने निर्भयपणे व जबाबदारीने मतदान करावे, कारण याच माध्यमातून देशाचा विक
#election लोकशाहीत मतदान हा नागरिकांचा महत्त्वपूर्ण हक्क आहे. प्रत्येकाने निर्भयपणे व जबाबदारीने मतदान करावे, कारण याच माध्यमातून देशाचा विक #मराठीकविता
read moreaaj_ki_peshkash
Devanand Jadhav
.......... ©Devanand Jadhav #MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य
#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य #मराठीपौराणिक
read moreअदनासा-
विडियो सौजन्य एवं हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C5JrFK5rt9n/?igsh=YjZyYnNoNndwYnM5 #भारत #English #न्यायमूर्ती न्याया #Instagram #Judge #Videos #भ्रष्टाचार #न्यायाधीश #demonitisation #अदनासा #बीव्हीनागरत्ना
read moreSantosh Jangam
#HappyMusic कविता "चैत्र नववर्ष: उत्कर्ष प्रारंभ"गुढी पाडव्याचा सार हे नवीन सुरवात, चांगुलपणाचा विजय, आणि सत्याच्या मार्गावर चालणं असतं. हे #मराठीकविता
read moreSangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा