Find the Latest Status about जे॰ जे॰ थॉमसन पुस्तकें from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जे॰ जे॰ थॉमसन पुस्तकें.
HintsOfHeart.
"इतने ऊँचे उठो कि जितना उठा गगन है इतने मौलिक बनो कि जितना स्वयं सृजन है" ©HintsOfHeart. #द्वारिका प्रसाद माहेश्वरी -हिन्दी के साहित्यकार जिन्होंने बाल साहित्य पर 26 पुस्तकें लिखीं, जिससे वे 'बच्चों के गांधी' भी कहलाते हैं।
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Sangeeta Kalbhor
श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा लपेटून घ्यायचे असते तुला उबदार श्वासात नको असतो थोडाही दुरावा प्रणयी सुवासात विळख्यात तुझ्या अखंड डुंबून माळावा सुगंध भिडता नजरेला नजर यौवनाचा भलताच गंध कडाडावी शलाका रे तुझ्या हळुवार स्पर्शाने मी माळावा अवघा वसंत किती किती हर्षाने श्वासांचा श्वासांना पडता विळखा मंत्रमुग्ध व्हावे मला जे जे सांगायचेय ते न सांगता तुला कळावे सरसावून यावास तू मला घेण्या मिठीत सखया सामावता तुझ्या बाहूत क्षणही नको जावा वाया...... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम
Sangeeta Kalbhor
नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने दे चपराक अशी झापड उघडावी आळसाची बहरावी अशी मती नवीनवेली पाने पळसाची आचमन करुन भावनांचे भाव मनी झिरपू दे जे जे चांगले ,उदात्त खिरापत तयांची वरपू दे आज आत्ता आणि आत्ताच जगणे ध्यानी घेऊ दे ओंजळ भरभरून सुखाची दुःखालाही कवटाळू दे नकोच रे काही काही चिंता नकोच कसला गुंता भिडायला येऊ दे माणसाला माणुसकी न सोडता..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त
Spidey2411
Prashu_
Sangeeta Kalbhor
आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं.. आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला.. असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं.. तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा.. पण..पण...तुला हे कसे कळावं.. आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय.. ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी.. शब्दांतून जगतेय तुला..शब्दांतूनच जगवतेय मला.. तक्रार..सांग ना कुठल्या गोष्टीची करु... तू ना कधी भेटलास मला ना कधी भेटणार... निर्विकार असं एक रुप तुझं जे शब्दाशब्दात मला गवसत..त्याकडे कशी बरं तक्रार मी करायची.. मला तरी नाही रे जमणार...मग काहीही झाले तरी.. तू मला तुझी मानतोस की नाही या फंद्यातही नाही पडायचे मला..कारण त्याने माझ्यात काहीही फरक पडणार नाही...तसूभरही... मी तुला मानते..मी तुला माळते एवढे बस आहे माझ्यासाठी आणि तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी.. नकोचं भेट आणि नकोचं बोलणं थेट... शब्द आहेत की भाव व्यक्त करायला आणि तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला... आताशा मला कसलाही त्रास होत नाही रे..कसलाचं.. तू मला block कर अथवा unblock मी मस्त असणार आहे माझ्या विचारात ..माझ्या शब्दात ..ज्या शब्दात तू असणार आहेस.. तू नसूनही असणारचं आहेस शब्दात तेव्हा देहरुपाने असाणाऱ्या अस्तित्वापेक्षा निश्चल ,निर्विकार रुप मला भावतं..फक्त मी मग्न आहे ना याला महत्त्व आणि हेचं बघ माझं तत्व.. नको असताना झाली प्रीती आणि बसले मी चित्त तुला अर्पूण... आता यायला हवी अविस्मरणाची लाट जी मला माझेपण हरवून दूर घेऊन जाईल...क्षितीजापल्याड..जिथे जाणीवचं हरवून जाईल... माझी नसण्याचीही.. आणि उरणार नाही मग त ही तक्रारीचा जो तुझी तक्रार करु शकेल... कळत नकळत ..... पण ऐक हं... तू कितीही दूर गेलास किंवा लपलास कुठेही..तरी नाही कमी व्हायची माझी प्रीती जी माझ्यावरही नाही होऊ शकणार माझ्याच्याने कधीचं... कळेल का एवढे रे तुला..मी न सांगता न मागता देशील का माझ्या शब्दात माळण्याचा हक्क...जो मला हवा आणि हवाचं आहे....कायमस्वरूपी..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत