Find the Latest Status about marathi poem on woman from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Ritesh Gadam
आयुष्य ••• किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात कधी भविष्याच्या स्वप्नाच्या रंगात तर कधी प्रेम भंगात... कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात. कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते तर कधी मैत्रीच्या मोहात... कधी मायेच्या ममतेत फुलते तर कधी बापाच्या प्रेमात बहरते. कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते तर कधी एकट्या एकट्यात हस्ते. कधी सुखाच्या किनार्यावर शांत बसते तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते कधी चंद्रावाणी सौम्य वाटते तर कधी सूर्या वाणी कठोर भासते... _ रितेश गडम ©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.
#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता
read moreVaidehi Shhalu
कालच्या "मी" च्या गर्भातून उमलले आजची "मी" कालच्या चुका कालचं शहाणपण घेउन जन्मले आज "मी" प्रतिबिंबीत होत राहिल माझ्यात कुठेतरी कालची "मी" काही तोडलेले बंध काही नवं अंकुरलेलं घेऊन जन्मले आज "मी" स्त्रीत्वाचा हात धरून निभावली माझी नाती मी कधी नात्यात हरवत कधी स्वतःला शोधत अचानक स्वतःला सापडले "मी" ©Vaidehi Shhalu #vaidehipoetry #marathi #MarathiKavita #womansDay #Woman #Thoughts
#vaidehipoetry #marathi #MarathiKavita #womansDay #Woman Thoughts #मराठीकविता
read moreworldofpoetry__
अलगद आयुष्यानं गळाभेट घ्यावी अगदी... क्षणार्धात जणू काही वसंताची मैफिल सजावी... जणु सरीच्या येण्यानं उन्हास उबेची विसर पडावी... तशी काही माझी अन् आयुष्याची भेट घडावी... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #marathi #poem
Atharva Jayant Gokhale
नव्या वर्षाची, नवी पहाट, संकटाचा हाच अंत, नात्यांचे बंध जोडिते, गोड गोड मकरसंक्रांत, मायेचे चार बोल, माझ्या ओठांवर स्वार, नऊ रात्रीतले नऊ रूपं, मज दिसती हजार, कवितेच्या रूपाने भावनांना, मिळतोय थोडा आसरा, शब्दांचे तोरण बांधुनी, साजरा होतो दसरा, अर्थपूर्ण वाक्यांनी नटल्या, या काही ओळी, काळोखाचा नाश करणारा, एकमेव सण दिवाळी, - अथर्व. ज. गोखले ( यवतमाळ, महाराष्ट्र ) ( मो. नं -7558404903) ©Atharva Jayant Gokhale #marathi #poem
Anchor Premprakash
पाऊस पडल्या नंतरचा मातीचा सुगंध.. आजीने शहरात जाताना आपल्या तोंडावरून फिरवलेला मायेचा हात.. माय बापाचा आपल्या साठी तुटणारा जीव.. ज्यांच्या सोबत नदीत डुबक्या मारल्या.. ईटी- दांडू खेळलो ते जिग्गी मैतर.. गावशिवारच्या आठवणी.. गावाकडील माणसं. त्या गोड आठवणींना , कधी न विसरता येणाऱ्या क्षणांना.. कायम "काळजात" जपलं पाहिजे... प्रेमप्रकाश poem marathi
poem marathi
read more