Find the Latest Status about मरगळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरगळ.
yogesh atmaram ambawale
उदास मनाची मरगळ, दूर करी आठवणींचा दरवळ.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवळ... #दरवळ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
बहाणा एक कप चहाचा... अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा. बहाणा एक कप चहाचा... काही क्षणांच्या विसाव्याचा आनंद लुटण्याचा. एक कप चहा... #tealover #चायकेबहाने #चहाप्रेमी #एककपचाय #yqtaai #yqmarathicharoli बहाणा एक कप चहाचा... अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा. बहाणा
shayar_dillwala
तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस तरी मी हुरळून जातो... नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो... तू दिसशील या आशेने तुझ्या घरा पासून मी वळून जातो... जेवढ्या हव्याशा आहेत तुझ्या आठवणी तेवढ्याच त्रास दायक सुद्धा, मी कधी कधी त्यांच्या पासून पळून जातो... ©shayar_dillwala तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस तरी मी हुरळून जातो... नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो... तू दिसशील या आशेने तुझ्या घरा पासून मी वळून जातो.
yogesh atmaram ambawale
YQ मला मिळालेलं मोठं वरदान आहे, माझ्या मरगळलेल्या लेखणीस जीवनदान आहे, छान लेखक सोबत असल्याचा अभिमान आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता.. पहिल्या ओळीत सहा शब्द असणारं आहे दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असणारं आ
yogesh atmaram ambawale
हाच तो चहा,जो माझा खास सोबती आहे, ज्याची सोबत मला नेहमीच हवीहवीशी वाटते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा केव्हा मी ह्याची आठवण काढतो, लगेच हा सोबतीला हजर राहतो. जेव्हा हा घरी नसतो ह्याला भेटायला मी टपरीवर जातो हॉटेल मध्ये जातो. ह्याला भेटता ह्याची सोबत मिळाली की अंगातली सारी मरगळ निघून जाते.तरतरी येते अंगात, जे काही लपलेलं असतं डोक्यात झटकन येते मनात. हाच तो चहा ज्याची सोबत मला केव्हाही खास जाणवते, केव्हाही वैताग आला,कंटाळा आला की मी ह्याचीच सोबत धरतो, ह्याला भेटण्यासाठी मी सतत तळमळत असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
काही प्रेमाचे क्षण आपले आयुष्य वाढवते, मरगळलेल्या आपल्या जीवनास नवचैतन्य देते. तर काहींना प्रेमाचे क्षण हे नैराश्य देते, दुरावलेल्यांच्या आठवणीत एकांत देते. सोबत असताना प्रेमाचे क्षण भरभरून सुख देते, तर आठवणीतले असताना रडवते,खूप दुःख देते. प्रेमाचे क्षण हे कित्येक रुपात अनुभवले जातात, आई वडिलांपासून,बायका मुलांपर्यंत सर्वांचेच असतात. प्रियकर,प्रेयसी सोबतचे प्रेमाचे क्षण म्हणजे फक्त आणाभाका, काहींचे प्रेमाचे क्षण म्हणजे सच्चा प्यार नाहीतर नुसत्याच थापा. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्
yogesh atmaram ambawale
Your quote हे मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे, माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे. आभार मानतो मनापासून Your Quote चे, ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे. लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो, अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो. तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही, तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय
yogesh atmaram ambawale
प्रिय चहा तुझं नाव जरी काढलं ना, तरी ताजेतवाने झाल्यासारखे वाटते, अंगातली पुरी मरगळ निघून जाते. तुझ्यावर आपलं इतकं प्रेम आहे की कुणी झोपेत जरी विचारलं ना, "चहा घेणार का" आपण लगेच उठून बसणार. खरं सांगायचं तर तू माझा सर्वात जवळचा सोबती आहे. तुझी आठवण आली की तू क्षणार्धात हजर राहतोस. मग ते बाजारात असो किंवा कुठल्या चौकात असो, स्टेशन ला असो किंवा कुठल्या बस डेपोत असो. हॉटेल व्यतिरिक्त टपरी नामक तुझ्या राहण्याची सोय असलेली जागा लगेच कुठेही सापडते. मोठ्या लोकांनी तुझे बरेच प्रकार केलेत ते पण रंग लावल्यासारखे म्हणजे,ब्लॅक टी, ग्रीन टी,यलो टी असो आपल्याला बाबा तुझे साधे सरळ प्रकारच आवडतात जसे,पिवर,राजवाडी,कडक,उकाळा वगैरे वगैरे.. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे प्रिय चहा... #प्रियचहा #प्रियचहा1 #collab #yq
yogesh atmaram ambawale
तू मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे, माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे. आभार मानतो मी मनापासून तुझे, तुझ्यामुळेच मी मनातील विचार अंतरीच्या भावना कागदावर उतरवायला शिकलो लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो, अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो. तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही, तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते तुझी , yq ताई ची आणि Your Quote वरील मान्यवरांची. तू आहेस म्हणून रोज नवनवीन विषयावर नवे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, आणि वाचन तर खूपच छान होते प्रिय your quote तुझ्यामुळे खूप छान छान लेखकांच्या सानिध्यात राहायला मिळते. इतका सुंदर मंच तू तयार करून दिलास नव नवे लेखकांसाठी ह्या साठी तुझे खूप खूप आभार. तू नसता तर कदाचित आमच्या पैकी किती तरी जणांच्या मनाच्या आत दडून बसलेली ही लेखनाची उत्तम कला कदाचित लोकांसमोर आलीच नसती. तुझ्यावर लिहायचं तर खूप काही आहे पण तू आहेसच इतका महान की शब्द ही कमी भासू लागतात. शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #collab #yqtaai B
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा