Find the Latest Status about तिथल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिथल्या.
Sangeeta Kalbhor
नको पुन्हा मिलन.. तूला वाटले तरी मलाही वाटायला हवे समीप तू येता अंग नि अंग पेटायला हवे धग नुसती काय कामाची तिथल्या तिथ धुमसणारी दाह होत असताना उरी जिथल्या तिथ उसळणारी हवा मला अंगार लख्ख तनमन तृप्त करणारा क्षणभरासाठी तरी ब्रम्हानंदी टाळी वाजवणारा मग नको पुन्हा मिलन जे युगायुगांचे द्योतक आहे पवित्र अशा प्रीतीचे उगा ,उगा पातक आहे..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #woaurmain नको पुन्हा मिलन.. तूला वाटले तरी मलाही वाटायला हवे समीप तू येता अंग नि अंग पेटायला हवे धग नुसती काय कामाची तिथल्या तिथ धुमसणारी
kapil.D
2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र फिरताहेत लांडगी माजवताहेत अस्थिरता करताहेत भ्याड हल्ला लाचार भुकेल्या घरांवर अशा या भयान जंगलातून फिरताना गोठून गेलंय रक्त ... त्याच लांडग्यांना नमवण्यासाठी माझ्या गोठलेल्या रक्तातून वणवा पेटवायचाय मला...... कुणी हिंदू कुणी मुसलमान कुणी आमकां कुणी ढमका या जातीधर्माच्या गर्दीत हरवलाय तिरंगा .... या गर्दीच्या वादळातून समतेची ज्योतच विझलीय... म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून समतेची मशाल पेटवायचीय मला..... हरवलाय न्यायालयातील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कटघरयात खेळलं जातंय मष्टीयुद्ध चिरडली जाते माणुसकी तिथल्याच पायरीवर... मिळवायचाय न्याय मला म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून मष्टीयोद्धा घडवायचाय मला.... - कपिल D Mh38 महाराष्ट्र 9284091853 2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र फिरताहेत लांडगी माजवताहेत अस्थिरता करताहेत भ्याड हल्ला लाचार भुकेल्या घरांवर अशा या भयान
yogesh atmaram ambawale
तो बॉस असतो.. क्षणार्धात कुठलाही निर्णय घेऊ शकतो. कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं. कारण... तो सरकारी कर्मचारी असतो, जरा काही बोललो की काम अडकवून ठेवतो. कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं. कारण... ते सरकारी हॉस्पिटल असतं, तुम्हाला काय समजतं? तिथल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असतं. कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं. कारण... ती शाळा असते,जे आवाज चढवतात, नंतर त्यांच्या मुलांकडे चांगलेच लक्ष दिलं जातं. कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं. कारण... ज्याचा रुबाब आता वाढलाय, त्याला आपणच निवडून दिलेलं असतं. सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #collab #yqtaai
sandy
एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला
yogesh atmaram ambawale
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर, कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे. कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे, ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे... ..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे
sandy
सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
yogesh atmaram ambawale
जसे तुम्ही देवाला मानता तसे मी ही मानतो फरक इतकाच आहे की मला दाखवता येत नाही, असो मी देवाला किती मानतो हे मी जाणतो नि माझा देव जाणतो. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) भक्तिभाव म्हणजे काय?? #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #भक्तीभाव #नामस्मरण #देवाशीसंवाद भक्तिभाव म्हणजे काय ? रोज सकाळी
sandy
"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
sandy
भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! "काहीही करा डाॅक्टर ! पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह