Find the Latest Status about टपोरे थेंब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टपोरे थेंब.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Devanand Jadhav
अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले सरी समवेत माझ्या अश्रूत सामील झाले •देवानंद जाधव• धामणी, पुणे. ©Devanand Jadhav अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले... #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी
Deepak Patil
Santosh Jadhav
पहिला पाऊस अन् तू ...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊलखुणा,ती वाट अन् त्या वाटेवरचा तो जुना पूल..., ते खळाळतं पाणी,ती गुलाबी हवा अन् ते गुलाबी रानफूल...! सारा आसमंत, सारे जीव अन् ते सारं रान ओलेचिंब मश्गुल..., बेधुंद, बेभान बरसणार्या पावसाला जणू माफ असते चूकभूल...! पहिला पाऊस, तो पहिला शहारा अन् ते मनातले काहूर..., पहिला पाऊस, पहिला थेंब अन् आजही तुझी आठवण येते जरूर...! तुझी आठवण येते जरूर...! -sj ©Santosh Jadhav #rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ
Prerana Jalgaonkar
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं
Prerana Jalgaonkar
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
Prerana Jalgaonkar
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं
Prerana Jalgaonkar
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
Kunal Salve
सरी पावसाच्या तु झेलतांना मी एक थेंब होऊन तुला स्पर्शाव झालीच मजल तुझ्यापर्यंत यायची तर ठीक, नाहीतर तुझ्यासाठी माझं अस्तित्व तुटता तारा व्हावं ! PC: KHADOOS SHREYA 😍👊 Shreya 👑💜💜 #पावसाच्या एका थेंबाची गोष्ट साधी सरळ सोपी मग तो थेंब काल्पनिक का होईना आपण होऊन पाहावं पण लिहिणं सोपं ज
Kunal Salve
तो येईल मी होऊन एकदा त्याला भेटशील चेहरा नसेल,बोलणं नसेल फक्त मनसोक्त भिजून तु त्याला थेंब थेंब तुझ्यातून ओघळून देशील ! #pc_google #पाऊस #मी #थेंब